राम नवमीच्या दिवशी वीज वितरण कंपनीचा उडाला बोजवारा…रामभक्तांच्या दु:खावल्या भावना…?
राम नवमीच्या दिवशी वीज वितरण कंपनीचा उडाला बोजवारा…रामभक्तांच्या दु:खावल्या भावना…?
आज शनिवार दि.१३ एप्रिल रोजी राम नवमी असल्याने श्रीगोंदा शहरात अनेक ठिकाणी व राम मंदिरांमध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आकर्षक आयोजन करण्यात आलेले होते. शिवाजी चौकात भजन,मेन रोड येथील राम मंदिरात किर्तनाचे,असे अनेक मंदिरांमध्ये आयोजन करण्यात आलेले होते. यामध्ये राम भक्तच काय सर्व स्तरातील नागरिक मोठ्या संख्येने राम जन्माच्या उत्सवासाठी जमले होते. कार्यक्रम रंगात असताना वीज वितरण कंपनीच्या अधिकार्यांनी वीज घालविली.
यावेळी,अनेक ठिकाणी तीव्र संताप नागरिकांत उसळला. राम नवमीचा महत्वाचा उत्सव असताना वीज वितरण कंपनीच्या अधिकार्यांनी वीज घालविण्यास आजच कसा मुहुर्त काढला?त्यांच्यावर कारवाई का करु नये?असा आरोप दक्ष नागरिकचे अध्यक्ष दत्ताजी जगताप यांनी यावेळी केला आहे. मागील काही अठवड्याच्या कोणत्याच शनिवारी वीज का घालविली नाही ? जो काही तांत्रीक घोटाळा दुरुस्त करायचा होता.तो आगोदर किंवा राम जन्माच्या उत्सवानंतर म्हणजे,दुपारी १ वाजेनंतर करता आला नसता का? असा ही सवाल जेष्ठ नागरिक सुधाकर खर्डेकर यांनी विचारला. राम सर्वांचेच आहेत.मग वीज वितरण चे नाहीत का ? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने अनुत्तरीतच राहिले आहेत. दक्ष नागरिक फाऊंडेशन कडे अनेक नागरिकांनी तक्रारींचा पाढा वाचला आहे.
याविषयी अधिकाऱ्यां कडे विचारणा केली असता.उडवा उडवीची उत्तरे मिळाली आहेत. आम्ही सहिष्णु आहोत याचा गैर फायदा घेऊ नका.असे रोख ठोकपणे दत्ताजी जगताप यांनी अधिकाऱ्यां ना सुनावले आहे. यापुढे अशी चुक सहन केली जाणार नसल्याचेही त्यांनी सांगितले आहे.