केडगाव येथील सौ. जयश्री रवींद्र फाळके यांनी राज्य शासनाच्या महिला व बालविकास विभागाच्या ‘ई-पिंक रिक्षा योजने’ चा लाभ घेत आत्मनिर्भरतेकडे यशस्वी भरारी घेतली आहे.
✨ ठळक वैशिष्ट्ये :
दुहेरी जबाबदारी : आर्थिक संकटावर मात करण्यासाठी दिवसा ई-पिंक रिक्षा चालवणे आणि रात्री सुरक्षारक्षक म्हणून कर्तव्यपालन.
आर्थिक स्वावलंबन : शासनाच्या योग्य प्रशिक्षण आणि आर्थिक साहाय्यातून स्वतःचा रोजगार निर्माण.
कुटुंबाचा भक्कम आधार : अथक परिश्रमातून कुटुंबाचा आर्थिक भार हलका करत मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी समर्थपणे पेलली.
जिद्द, चिकाटी आणि शासकीय योजनांची योग्य साथ असल्यास महिला पारंपरिक चौकटीबाहेर पडून कोणत्याही क्षेत्रात स्वतःचे स्थान निर्माण करू शकतात, हे जयश्रीताईंनी सिद्ध केले आहे. त्यांची ही वाटचाल समाजातील सर्व महिलांसाठी एक उत्तम आदर्श आहे !
ई-पिंक रिक्षा योजनेतून महिला सक्षमीकरणाची प्रेरणादायी गाथा !















Leave a Reply