पंधराव्या वर्षी एम.एस.सी.

(सुषमा वर्मा,उत्तर प्रदेश)
इ.स. २००० मध्ये जन्माला आलेली सुषमा वर्मा लखनऊमध्ये कृष्णानगर इथल्या बर्गावन मोहल्ल्यात राहते.तिच्या घरी टीव्ही नाही.छोट्या बहिणीसोबत खेळने हाच तिचा विरंगुळा.इतका अभ्यास आपली मुलगी करते आहे.म्हणून,तिला ट्युशन लावाव्यात, तिला नवीन वह्या पुस्तकं आणून द्यावेत, अभ्यासासाठी तिला वेगळी खोली द्यावी,असं तिच्या आई-बाबांना वाटत असणार.पण त्यांना ते शक्य नव्हतं,वडील तेजबहादुर आठवी पास झालेले. रोजंदारीवर काम करणारे.आई छायादेवी गृहिणी. कधीही शाळेत न गेलली,लिहिता वाचता न येणारा रोजंदारी वरच्या कामगाराला असे किती पैसे मिळत असणार.मुलांना अशा सोयी-सुविधा देण्यात त्यांना परवडनार नव्हतं.
जेमतेम एका खोलीत त्यांच छोटं घर,आई-बाबा,मोठा भाऊ शैलेंद्र,लहान बहीण आनन्या आणि सुषमा असे पाच जण राहायचे.घराच्या कामात आईला मदत करत,लहान बहिणीकडे बघत सुषमा वरच्या वर्गाचा अभ्यास करत होती.
सगळे तिचा आदर कौतुक करायचे आणि त्याबरोबर बालपण ही जपू द्यायचे.गाणी ऐकण,चित्र काढणं, असे तिचे छंद त्यामुळेच टिकून राहिले.सुषमा तेराव्या वर्षी बी.एस्सी.झाली.त्यातही पहिल्या दुसऱ्या आणि चौथ्या सेमिस्टर मध्ये ती महाविद्यालयात पहिली आली.सुषमाचं शिक्षण चालू होतं.पण,तिच्या मनात खंत होती की,आपल्या आईला वाचता लिहिता येत नाही.तिने ठरवलं आपल्या आईला शिकवायचं.

अगदी लहानपणापासूनच सुषमा तिच्या वयापेक्षा मोठ्या मोठ्या गोष्टी करायची.२००३ मध्ये एकेदिवशी लखनऊ मधल्या राय उमानाथ बली प्रेक्षागृहात एक कार्यक्रम चालू होता.त्यामध्ये श्री.रामचरितमानस पाठ चालू होता.हजारो लोकांसमोर मंचावर उभे राहून सुषमान त्यातला श्लोक म्हणायला सुरुवात केली. “वर्णानामर्थसंघानां रसानां छन्दसामपी” प्रेक्षक चकित होऊन सुषमा कडे बघत होते.सुषमा तेव्हा अवघ्या तीन वर्षांची होती.कार्यक्रम संपल्यावर एकाने तिला विचारलं बेटी सामने सारे लोक बैठे थे,आपको डर नही लगा! नही मुझे तो ये आता हैना रामायण,तो फिर डर कैसा?
भैय्याची पुस्तक घेऊन सुषमा धडे वाचून बघत होती. स्वाध्याय सोडत होती,गणित करून बघत होती. चुकलेली गणित पुन्हा पुन्हा न कंटाळता करून बघत होती.तिचे प्रामाणिक प्रयत्न बघून,भैय्या तिला मदत करायला लागला.ती एखादी शंका घेऊन त्याच्याकडे गेली.की,तो सोडून द्यायचा.सुषमाला भैय्याची शिकवण सुरू झाली.भैयाही काही साधा नव्हता. त्यानेही चौदाव्या वर्षी बी.सी.ए.ची डिग्री मिळवली होती.जी सामान्यतः विसाव्या वर्षी मिळते.
सुषमा सातत्याने रोज मन लावून अभ्यास करत असे आणि भैय्याला येते ते आपल्याला यायला हव याचा तिने ध्यास घेतला होता.सहा वर्ष्याची छोटी मुलगी जर म्हणाली की, मला दहावीची परीक्षा द्यायची आहे.तर, कोण विश्वास ठेवणार?पण सुषमाचा आई-बाबांकडे हट्ट चालू होता.तिची किती तयार झाली हे पाहण्यासाठी भैय्याने तिच्या काही परीक्षा घेतल्या. त्याच्याच पुस्तकावरून तर ती अभ्यास करत होती ना? पण त्याची खात्री पटली की,सुषमा दहावीची परीक्षा देऊ शकते.तेव्हा त्याने आई-वडिलांना पटवून दिलं.तिच्या वडिलांनीही शैलेंद्रच्या मदतीने सेंट मिराज सेंटर कॉलेजमध्ये अर्ज केला.तिला दहावीची परीक्षा देता यावी म्हणून,विनंती केली.पहिली ते दहावी आणि अकरावी,बारावी असे ते इंटर कॉलेज होतं.
बच्ची को डायरेक्टली बोर्ड एक्झाम मे तो नही बिठा सकते.बच्ची हुशार मालूम होती है.इसे बढावाभी देना चाहिये.नववी कक्षा के एक्झाम दे और फिर अगले साल दसवी भी दे सकती है.
बाबूजी आणि सुषमा व्हाईस चान्सलर आर.व्ही. सोबती सरांना भेटले.त्यांनी सुषमाला नववी मध्ये प्रवेश दिला.पण त्यासोबत तिच्या शिक्षणाच्या खर्चाची व्यवस्थाही केली.
सुनो तेजबहादुर लडकी होनहार लगती है.पर तुम्हारे काम का कोई ठीकाणा नही.आज काम है कल का पता नही ? ऐसा करो हमारी यूनिवर्सिटी मे सफाई सुपरवायझर कि पोस्ट खाली है,जॉईन कर लो.
मग काय बापलेक दोघे एकाच इंटर कॉलेजमध्ये जायला लागले.वडील सफाई पर्यवेक्षक आणि लेक असामान्य बालक.सोबती सरांनी नियमात राहूनही तिला मदत केली.आठव्या वर्षी सुषमा दहावी झाली.अचानक एक दिवस”लिम्का बुक ऑफ रेकॉर्डचे” लोक सुषमाला शोधत लखनऊ मध्ये आले. चमत्कार वाटाव्यात अशा जगभरातल्या नैसर्गिक घटना आणि माणसांनी केलेले विक्रम याची नोंद “गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड” करतो.तसेच भारतातल्या विक्रमांची नोंद”लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स”मध्ये होते.दहावी पास होणारी सर्वात लहान वयाची मुलगी म्हणून,सुषमाचं नाव नोंदवलं गेलं.
सुषमाला चित्र काढायला आवडतात.रेडीओ वरील गाणे ऐकायला आवडतात,बारावीत असताना एके दिवशी ती गुणगुणत चित्र काढत बसली होती.पेन्सिल आणि रंगांमध्ये रंगून गेली होती.त्या दिवशी एक गंमत घडली.कोण कुठली जपानची संस्था सुषमाला शोधत लखनऊमध्ये आली.त्यांना म्हणे त्यांच्याकडच्या इंटेलिजन्स क्वेशन टेस्ट(आय.क्यू.)साठी सुषमाला निमंत्रण द्यायचं होतं.(आई क्यू.)म्हणजे मेंदूची तांत्रिक क्षमता मोजण्याचे एकक.या टेस्टमध्ये अनेक प्रकारच्या परीक्षा घेतल्या जातात आणि त्या सगळ्या परीक्षांचे विश्लेषण करून,बुद्धांक ठरवला जातो.असं म्हणतात की,जगातले ९५ टक्के लोक ७० ते १३० बुद्ध्यांकाचे असतात.स्वतःच्या बुद्धी व सातत्याने कष्ट घेणारे जे मोजके लोक असतात.त्यांचा बुद्ध्यांक १३० हुन अधिक असतो.अल्बर्ट आईन्स्टाईन आणि स्टीफन हॉकिंग यांचा बुद्ध्यांक अनुक्रमे १६० आणि १५४ एवढा होता.
मग,छोट्या गावात छोट्याशा घरात राहणारी सुषमा एक दिवस विमानात बसून जापानला निघाली.त्या संस्थेने तिची जाण्याची,राहण्याची तीथे फिरण्याची व्यवस्था केली होती.विमान आकाशात झेपावले, तेव्हाच सुषमान खिडकीतून पाहिलं,इतक्या उंचावरून आपलं घर दिसेल का?असं तिला वाटत होतं.जपानच्या त्या संस्थेने जपान मधून ३५ मूलं गोळा केली होती.त्यावेळी सुषमा दहा वर्षांची होती. इतर मुलं २०-२२ वर्षांची.सुषमा त्यांना भेटली.त्यांची भाषा वेगळी होती,खेळ वेगळे होते,खाण्याचे पदार्थ कपडे सगळं वेगवेगळे होतं.प्रत्येक मुलांची एकमेकांशी मैत्री झाली.गप्पा झाल्या,दुसऱ्या दिवशी झालेल्या आई.क्यू.टेस्ट मध्ये सगळ्या ३५ मुलांतून सुषमा पहिली आली.आत्तापर्यंतचा सर्वोच्च आई.क्यू. हा २५० ते ३०० विल्यम जेम्स सायडीस याचा होता. एक असामान्य बालक म्हणून तो प्रसिद्ध होता. योगायोग म्हणजे सुषमाची गणती सुद्धा जगातल्या असामान्य बालकांमध्ये होते.
क्रमशः

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading