बलुतं,दया पवार..

अभिजनांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारं ज्येष्ठ लेखक दया पवार यांचं हे आत्मकथन, भारतीय समाजाच्या भीषण, भेदक वास्तवाचं प्रखर दर्शन घडवतं. दगडू मारुती पवार या नायकाच्या दुःख, यातनांच हे ‘बलुतं’ हे बलुतं सामाजव्यवस्थेनंच बांधलेले. दया पवार हे ज्येष्ठ साहित्यिक, कवी आणि विचारवंत म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांच्यातच या दगडूचा वास आहे. दगडूचं बालपण खेड्यात आणि मुंबईतही गेलं. त्यामुळे दोन्ही संस्क्रुतीचं दर्शन घडतं. दोन्ही संस्कृतीतील माणसं, त्यांचं आयुष्य, दैन्य आणि तथाकथित लब्धप्रतिष्ठित समाज यांचं वास्तव समोर उभं राहातं.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading