दिनांक २७ जानेवारी २०२५, श्रीगोंदा:
दोन दिवसांपूर्वी चांडगाव-भिंगान हद्दीत मध्यरात्री चोरट्यांनी घातलेल्या धुमाकूळात दोन शेतकरी गंभीर जखमी झाले होते. या प्रकरणी श्रीगोंदा पोलीस स्टेशनने एका आरोपीला पकडून त्याच्याविरोधात भारतीय हत्यार बंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. चोरी, घरफोडी, गंभीर दुखापत, खूनाचा प्रयत्न यांसारख्या गंभीर कलमांऐवजी आरोपीवर Arms ACT कायद्यानुसार गुन्हा दाखल करून त्याला लवकरच सोडल्याने पीडित शेतकरी आणि स्थानिक पदाधिकारी संतप्त झालते.

शेतकरी आणि स्थानिकांनी पोलीस प्रशासनाच्या निष्क्रियतेचा निषेध करत प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आंदोलन केले. आंदोलनाच्या दरम्यान अवैध धंदे बंद करण्यासह, पोलीस प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. यामुळे आणखी तणाव निर्माण झाला.

घटनेची दुसरी बाजू समोर आली:
चोर म्हणून पकडलेल्या इसमाने आपली बाजू मांडली आहे. भिंगान परिसरातील रहिवासी असलेल्या आरोपीने सांगितले की, “मी दारूच्या नशेत घटनास्थळी गेलो होतो आणि मला चोरी केल्याची माहिती नाही. मात्र, चोरीचा संशय घेऊन लोकांनी मला अमानवीय मारहाण केली.” मारहाणीच्या तक्रारीसाठी तो श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गेला असता, पोलिसांनी त्याची तक्रार नोंदवण्यासाठी टाळाटाळ केली, असा आरोप त्याने केला आहे.

यामुळे पोलीस प्रशासनावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. पोलीस प्रशासनाने चोरट्यांविरोधात योग्य कलमांनुसार गुन्हा नोंदवला नाही, आणि आरोपीविरुद्ध मारहाणीची तक्रार नोंदवण्यासाठी टाळाटाळ करण्याचे काय कारण होते,? याचे उत्तर मिळणे बाकी आहे.
स्रोत:(आंदोलनं)

जाहिरात..
