सर्वधर्म सद्भावना विचार संमेलनात सामाजिक एकतेचा संदेश.. विचारवंतांचा सन्मान..

दिनांक २३ फेब्रुवारी २०२५ अहिल्यानगर:

सावित्री फातिमा सद्भावना विचार मंच, फुले शिव शाहू आंबेडकर विचार मंच आणि सत्यशोधक विचार मंच यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सर्वधर्म सद्भावना विचार संमेलन काल दिनांक २२ फेब्रुवारी रोजी अहिल्यानगर येथील सैनिक लॉन्स येथे यशस्वीपणे पार पडले.

या संमेलनात राज्यभरातील विविध धर्मांचे अनुयायी आणि प्रवक्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. समाजातील सौहार्द वाढविणे, जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन मानवतेचा संदेश देणे आणि सद्यस्थितीत देशात निर्माण होणाऱ्या द्वेषभावनेला विरोध करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला.

प्रमुख मान्यवरांचा गौरव:
या विशेष प्रसंगी विविध क्षेत्रातील विचारवंतांचा सन्मान करण्यात आला. डॉ. रफिक सय्यद सर, ॲड. संभाजीराव बोरुडे, सौ. स्मिता पानसरे, ह.भ.प. धर्मकीर्ती नितीन सावंत, सप्त खंजिरी वादक प्रबोधनकार सतपाल महाराज यांना सद्भावना विचार मंचतर्फे सन्मानपत्र, ट्रॉफी व पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

सद्भावना आणि एकतेचा संदेश:
प्रवक्त्यांनी आपल्या भाषणांमधून सामाजिक एकतेचा संदेश दिला. “जर देश अंधकाराच्या दिशेने वाटचाल करत असेल, तर त्या प्रवाहाला रोखणे ही काळाची गरज आहे,” असे प्रतिपादन अनेक वक्त्यांनी केले. धर्मकीर्ती नितीन सावंत यांनी आपल्या प्रभावी भाषणातून सद्भावनेचा महत्त्वपूर्ण संदेश दिला.

समारोप:
सत्यशोधक विचार मंचाचे भीमराव कोथिंबीरे यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार मानले व सद्भावना विचार संमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व सहभागी संस्थांचे अभिनंदन केले. या संमेलनाच्या निमित्ताने सर्वधर्मीय बंधु-भगिनींनी सामाजिक ऐक्याचे व सहिष्णुतेचे अनमोल मूल्य पुन्हा एकदा अधोरेखित केले.

स्रोत:(भीमराव कोथिंबीरे)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading