सावित्रीबाई जोतीराव फुले (३ जानेवारी, इ.स. १८३१ – १० मार्च, इ.स. १८९७) या भारतीय समाजसुधारक, शिक्षणतज्ज्ञ आणि कवयित्री होत्या.
त्यांना भारतातील पहिल्या महिला शिक्षिका म्हणून ओळखले जाते. त्यांचे पती ज्योतिराव फुले यांच्यासोबत त्यांनी भारतातील महिलांचे अधिकार सुधारण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

त्यांना भारतीय स्त्रीवादाची जननी मानले जाते. सावित्रीबाई आणि त्यांचे पती यांनी १८४८ मध्ये भिडेवाड्यात पुण्यात मुलींच्या शाळेची स्थापना केली. ही शाळा देशात स्थापन झालेल्या सुरूवातीच्या शाळांपैकी एक होती.
महाराष्ट्रातील सामाजिक सुधारणा चळवळीतील एक महत्त्वाची व्यक्ती म्हणून, त्या ओळखल्या जातात. त्यांनी विधवांचे होणारे केशवपन थांबवण्यासाठी पुण्यात न्हावी समजाचा संप घडवून आणला.
स्रोत:(गूगल)
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना विनम्र अभिवादन..!
