राजकुमार वर्धमान यांना अशी मिळाली महावीर उपाधी

कर्मकांड, अवडंबर आणि भीती यांच्या ओझ्याखाली दबलेल्या भारतीय जनमानसाला मार्ग दाखविण्यासाठी इसवी सन पूर्व सहाव्या शतकात जैन धर्माचे २४ वे तीर्थंकर भगवान महावीर यांचा उदय झाला. हा एक असा काळ होता, ज्या वेळी बौद्धिक उलथापालथ आणि अर्धवट ज्ञानावर आधारित आध्यात्मिक क्रांतीचा संक्रमण काळ मानला जात होता.

रूढीवादी परंपरा, परस्परांमध्ये असेलेले वैमनस्य आणि सोळा महाजनपदांच्या संघ प्रमुखांद्वारे निर्मित हिंसकतेने त्रस्त भारतीय सर्वसामान्यांच्या नजरा अशा आध्यात्मिक प्रणेत्याच्या शोधात होत्या, जो त्यांना अहिंसेच्या माध्यमातून आत्मज्ञानाच्या निश्चित मार्गावर घेऊन जाऊ शकेल. अशा संक्रमण काळात क्षत्रिय कुळातील राजा सिद्धार्थ यांच्या घरी राजकुमार वर्धमान यांचा जन्म झाला.

🔷१२ वर्ष केली कठोर तपस्या

माणसांमध्ये पसरलेला अंध विश्वास, अवडंबर, भीती आणि खोटेपणाच्या गर्तेत सापडलेले लोकांना पाहून वर्धमानाचे मन दु:खी झाले. पण महत्त्वाची गोष्ट अशी की, संसारातील सर्व आव्हानांनी राजकुमार वर्धमान यांचे आयुष्य बदलून गेले. १२ वर्षांची कठोर तपश्चर्या केल्यानंतर वर्धमानला ज्ञानप्राप्ती झाली आणि ते महावीर झाले. महावीर म्हणजेच साधनेच्या मार्गात येणाऱ्या बाह्य बाधांवर पराक्रमासोबत विजय मिळविणारा होय.

🔷भगवान महावीरांनी सांगितली तीन तत्वे

कैवल्य प्राप्तीबाबत भगवान महावीरांनी सांगितलं की, आत्मज्ञानाचा मार्ग सर्वांसाठी शक्य आहे. पण यासाठी अहिंसा, सत्य, अस्तेय, अपरिग्रह आणि ब्रम्हचर्य यांना आत्मसात करून चित्तप्रवृत्तीचे परिशोधन करणे आवश्यक आहे. महावीर स्वामींनी जवळजवळ तीस वर्षापर्यंत आपल्या शिक्षणाचा प्रचार-प्रसार केला आणि तीर्थंकर पार्श्वनाथ द्वारे प्रतिपादित चार व्रत-सत्य, अहिंसा, अस्तेय आणि अपरिग्रह यामध्ये पाचवे व्रत ‘ब्रह्मचर्य’ याचाही समावेश केला. भगवान महावीरांनी अनेकांतवाद म्हणजेच स्याद्-वादाचा सिद्धांत सांगितला. खरं पाहता भगवान महावीर यांच्या अनेकांतवादाचे दर्शन गौतम बुद्धांच्या मध्यम मार्गासारखेच आहे. ज्याच्या अंतर्गत त्यांनी अतिवादी आणि निरीश्वरवादी मत वगळता, मध्य मार्ग स्वीकारला आहे. अनेकांतवादानुसार एखाद्या वस्तूचे अनेक पैलू असतात. पूर्ण ज्ञान फक्त कैवल्य-प्राप्तीमुळेच शक्य होते. कैवल्य प्राप्त करण्यासाठी भगवान महावीरांनी तीन तत्वे सांगितली- सम्यक् दर्शन, सम्यक् ज्ञान, सम्यक् चरित्र.

https://bit.ly/bspmycityshrigonda

🔷जाणून घेऊया तीन तत्वे

खरं तर, सम्यक् दर्शन सर्व प्रकारच्या कुप्रवृत्तींपासून मुक्त होण्याचे असे साधन आहे, याच्या सहवासात आल्यानंतर माणसाच्या मनात असलेला संशय आणि शंकांचे निरसन होऊ लागते आणि आत्मविश्वास दृढ होऊ लागतो. दुसरे साधन आहे सम्यक् ज्ञान, संसारिक बंधनातून मुक्तीच्या मार्गात सम्यक् ज्ञानाचे महत्त्व अधिक आहे. कारण, यांच्या अभावातच सर्व प्रकारची भौतिक कामे व्यक्तीसोबत संयुक्त होत जातात आणि बंधनाचे रूप धारण करतात. तिसरे साधन आहे सम्यक् चरित्र. याच्या अंतर्गत सच्चरित्रता आणि सदाचरण यावर विशेष भर दिला आहे. (Prince Vardhaman got the title of Mahavir) अशा प्रकारे ही तीन रत्ने सम्यक् दर्शन, सम्यक् ज्ञान, सम्यक् चरित्र यांचे पालन केल्यास मनुष्याची अस्तित्वाकडे होत असलेली प्रगती खुंटते आणि त्याची सर्व प्रकारच्या कुप्रवृत्तींपासून मुक्तता होते. याचा परिणाम म्हणून त्याला केवल अवस्थेचा भास होऊ लागतो. तीन रत्नांच्या सतत अनुशीलनाने संसारिक दु:खाचा अंत होणे शक्य होते.

🔹स्रोत:(ऑनलाइन वृत्त)

भगवान महाविर जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा व महामानवास विनम्र अभिवादन(बहुजन समता पत्र)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading