दिनांक ६ ऑगस्ट २०२४, श्रीगोंदा:
तालुक्यातील रूईखेल गावातील शेतकरी रस्त्याच्या वादामुळे सध्या अडचणीत आहेत. गणेश रामदास शेळके आणि इतर सहकारी शेतकऱ्यांनी तहसीलदार कार्यालय, श्रीगोंदा येथे अर्ज दाखल केला आहे, ज्यामध्ये रस्त्याच्या वहिवाटीची मागणी करण्यात आली आहे.
शेळके यांच्या अर्जानुसार, त्यांच्या शेतजमिनीच्या दक्षिण बाजूला गट क्रमांक १९, २१, २५ आहेत आणि पश्चिम बाजूस गट क्रमांक ४०, २६, ३९, ३८, ३० आहेत. हे शेतकरी घोरगांव-श्रीगोंदा रस्त्यावरून आपल्या शेतात ये-जा करतात. परंतु, काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे गटधारकांनी रस्त्यावर मुरुम टाकला असून त्यांनी शेतकऱ्यांना रस्त्याने ये-जा करण्यास प्रतिबंध केला आहे. त्यामुळे शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबातील लोकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
शेळके यांनी अर्जात स्पष्ट केले आहे की, रस्त्याच्या बंदमुळे त्यांच्या शेतीची आणि जनावरांची देखभाल करणे कठीण झाले आहे. त्यांच्या शेतमालाची वाहतूक करणेही अशक्य झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी तहसीलदारांकडे अर्ज करून गट क्रमांक २५, २१, १९, २६, ३०, ३८, ३९, ४० यांच्या बांधावरून दक्षिण उत्तर असा वडिलोपार्जित गाडी रस्ता पूर्वरत करण्याची विनंती केली आहे.
अर्जात गणेश रामदास शेळके, बिभीषण जबाजी शेळके, लक्ष्मण अंबु शेळके, निलेश रामदास शेळके, रमेश लक्ष्मण शेळके, प्रतीभ रामदास गव्हाणे, तेजस राजेंद्र गव्हाणे आणि स्वप्निल विजय गव्हाणे यांनी सह्या केल्या आहेत.
शेतकऱ्यांची मागणी आहे की, तहसीलदारांनी त्वरित निर्णय घेऊन त्यांना न्याय द्यावा. त्यामुळे शेतकऱ्यांची समस्या सुटून त्यांना त्यांच्या शेतीच्या कामासाठी आणि कुटुंबीयांच्या गरजांसाठी सहज रस्ता उपलब्ध होईल. याबाबतचे निवेदन पीडित शेतकऱ्यांनी श्रीगोंदा तहसील कार्यालयात नायब तहसीलदार बाबासाहेब जाधव यांना दिले आहे.
स्रोत:(निवेदन)




